
तब्बल १४ वर्षांपूर्वी कार्तिक आणि दीपा यांचा संसार पूर्वपदावर आलाच होता, तेव्हाच साक्षीचा एक दुर्धर आजार बळावला. ऐनवेळी कोणताही डॉक्टर ऑपरेशनसाठी जागेवर नसल्याने स्वतः कार्तिकने साक्षीचं ऑपरेशन करून तिचा जीव वाचवला होता. मात्र, याच दरम्यान असं काहीतरी घडलं की, ज्यामुळे साक्षीचा जीव गेला. यावेळी कार्तिकने ऑपरेशन चुकीच्या पद्धतीने केलं आणि त्यानेच मुद्दाम साक्षीचा जीव घेतला असा आरोप त्याच्यावर करण्यात आला. या सगळ्यात कार्तिक आणि दीपाला अतिशय चुकीच्या पद्धतीने अडकवण्यात आलं. यानंतर दीपामुळे तुला शिक्षा झाली, असं कार्तिकच्या मनात भरवून त्याला १४ वर्षांच्या तुरुंगवासात पाठवण्यात आलं.






