फलटणमध्ये बुद्ध जयंती महोत्सव जल्लोषात; मध्यरात्री अभिवादनापासून भव्य मिरवणुकीपर्यंत उत्साहाचा महासागर

0
2
फलटणमध्ये बुद्ध जयंती महोत्सव जल्लोषात; मध्यरात्री अभिवादनापासून भव्य मिरवणुकीपर्यंत उत्साहाचा महासागर

फलटणमध्ये बुद्ध जयंती महोत्सव जल्लोषात; मध्यरात्री अभिवादनापासून भव्य मिरवणुकीपर्यंत उत्साहाचा महासागर

फलटण : फलटण शहरात समता, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देणारी तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती यंदा अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती महोत्सव समितीच्या सहकार्याने आणि साहस क्रीडा मंडळाच्या पुढाकाराने आयोजित या महोत्सवात शहर व परिसरातील हजारो बौद्ध उपासक-उपासिका आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

महोत्सवाची सुरुवात ३० एप्रिल रोजी रात्री ११ .३० वाजता सर्व बौद्ध अनुयायांनी एकत्र येत तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून केली. यावेळी नगरसेविका सुपर्णा सनी अहिवळे, नगरसेविका मीना जीवन काकडे, नगरसेवक तथा आरोग्य सभापती सचिन रमेश अहिवळे, नगरसेवक विकास वसंतराव काकडे, प्रा. अजय अहिवळे, दत्ता अहिवळे ( सर ) तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर महोत्सव समितीचे अध्यक्ष हरीष काकडे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी उपस्थितांना बुद्ध जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आकर्षक बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती तसेच पंचशील ध्वजांनी सुंदर सजावट करण्यात आली होती.

यानंतर सकाळी ९ वाजता क्रांतीसूर्य महात्मा फुले चौक येथून भव्य बाईक रॅली काढण्यात आली. युवकांच्या मोठ्या सहभागाने निळे झेंडे, घोषणांचा जयघोष आणि एकतेचा संदेश देत रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. यानंतर सकाळी १० वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पारंपरिक लेझीम प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. लेझीमच्या तालावर सादर झालेल्या आकर्षक सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.

या महोत्सवाचे उद्घाटन आयु. तुषार शांताराम मोहिते (सह आयुक्त, मुंबई – भारत सरकार, IRS), आयु. रावसाहेब पोपटराव मोरे (कार्यकारी अभियंता, नीरा उजवा कालवा विभाग, फलटण), आयु. रत्नरंजन दिनकर गायकवाड (नगर अभियंता, नगर परिषद, फलटण), आयु. सागर अरविंद कांबळे (शाखा अभियंता, नीरा उजवा कालवा विभाग, फलटण), आयु. विजय पत्रोजी रामटेके (वनक्षेत्रपाल, सामाजिक वनीकरण विभाग, फलटण), आयु. सागर चंद्रकांत अहिवळे (Managing Director, Green Solution Group of Industries), आयु. लक्ष्मण सुभाष अहिवळे (सहाय्यक महसूल अधिकारी, तहसील कार्यालय, कोरेगाव), आयु. प्रतीक्षा गौतम काकडे (सहाय्यक कृषी अधिकारी, कडेगाव), आयु. डॉ. धनंजय सुभाष गायकवाड (MS, General Surgery), आयु. डॉ. सुमित दयानंद गायकवाड (MS, General Surgery ISM), आयु. डॉ. आदित्य लक्ष्मण अहिवळे (BDS), आयु. अमृता बाळासाहेब अहिवळे (उद्योग निरीक्षक), आयु. विशाखा चंद्रकांत कांबळे (महाराष्ट्र पोलीस, रत्नागिरी) आणि आयु. प्रतीक्षा सागर अहिवळे (ग्रामपंचायत अधिकारी) यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून आयु. वैशाली संदीप कांबळे (सातारा जिल्हा परिषद सदस्य), आयु. सचिन रमेश अहिवळे (नगरसेवक, फलटण), आयु. विकास वसंतराव काकडे (नगरसेवक, फलटण), आयु. सुपर्णा सनी अहिवळे (नगरसेविका, फलटण), आयु. मीना जीवन काकडे (नगरसेविका, फलटण) आणि आयु. अस्मिता भीमराव लोंढे (नगरसेविका, फलटण) आदी मान्यवर उपस्थित होते.

सायंकाळी ७ वाजता पंचशील चौक, मंगळवार पेठ येथून भव्य मिरवणुकीस प्रारंभ झाला. महिलांच्या सहभागाने सुरू झालेली ही मिरवणूक बालक, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सहभागाने पुढे सरकत होती. घोषणांद्वारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले तस तसेच यामध्ये पारंपरिक वाद्या आणि बुद्ध-आंबेडकरांच्या जीवनावर आधारित देखावे सादर करण्यात आले. यामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात सुंदर असे तथागत भगवान गौतम बुद्ध मुर्तीच्या देखावा तयार करण्यात आला होता तसेच मिरवणूकी मध्ये अंजठा लेण्यातील भगवान बौद्ध यांच्या देखावा तसेच अखंड भारत चक्रवती अशोक सम्राट यांचे अखंड मौर्य सम्राज्य  देखावा तसेच महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त च्या देखावा खास आकर्षण म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती २०२५ यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेली तथागत गौतम बुद्ध यांची २५० किलो वजन असलेले तथागत भगवान गौतम बौद्ध यांची मुर्ती आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली

मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांवरून शांततेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने मंगळवार पेठ धम्मयान चौक येथे विसर्जित झाली. विशेष म्हणजे संपूर्ण कार्यक्रमादरम्यान कुठलाही अनुशासनभंग न होता उत्सव यशस्वीरीत्या पार पडला.

या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व राजकीय व सामाजिक गटांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र येत एकतेचा संदेश दिला. यामुळे फलटण शहरातील सामाजिक सलोखा आणि ऐक्य अधोरेखित झाले.

जगभरातील सुमारे १८० देशांमध्ये साजरी होणारी बुद्ध पौर्णिमा हा अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. गौतम बुद्ध यांचा जन्म, बोधीप्राप्ती आणि महापरिनिर्वाण या तिन्ही घटना याच दिवशी घडल्यामुळे या दिवसाचे विशेष महत्त्व आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती महोत्सव समिती व साहस क्रिडा मंडळ आयोजक, स्वयंसेवक आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे यंदाची बुद्ध जयंती फलटण शहरात संस्मरणीय ठरली.