
मंगळवार पेठेतील विशाखा कांबळे हिची महाराष्ट्र पोलिस दलात दमदार निवड
फलटण प्रतिनिधी :- फलटण येथील मंगळवार पेठतील कु. विशाखा चंद्रकांत कांबळे हिने आपल्या मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर महाराष्ट्र पोलिस दलात (रत्नागिरी) यशस्वीरीत्या निवड मिळवली आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
लहानपणापासूनच शिस्तबद्ध जीवनशैली आणि देशसेवेची प्रबळ इच्छा बाळगणाऱ्या विशाखाने कठोर परिश्रम करून हे यश संपादन केले. स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करताना तिने अनेक अडचणींवर मात केली आणि अखेर आपल्या ध्येयाला गवसणी घातली. तिच्या या यशामागे तिच्या कुटुंबीयांचा पाठिंबा तसेच शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले.
विशाखाच्या या यशामुळे मंगळवार पेठेचे नाव उज्ज्वल झाले असून, इतर तरुण-तरुणींना देखील प्रेरणा मिळाली आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.








