
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्लीच्या प्रदूषणावर चिंता व्यक्त केली आहे. नुकतेच एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी सांगितले की, दिल्लीत येण्यापूर्वी ते परतीची तिकिटे बुक करतात. प्रदूषण निर्मूलन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.







