
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताची भूमिका पाकिस्तानविरोधात आक्रमक आहे. मंगळवार आणि बुधवारी रात्री भारताने पाकव्याप्त काश्मीरबरोबरच पाकिस्तानातही जोरदार हवाई हल्ले केले आहेत. या हवाई हल्ल्यात जवळपास ९० दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे. एवढेच नव्हे तर मुरीडके ते बहावलपूर पर्यंत लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.