
सध्या संपूर्ण भारतात दाक्षिणात्य चित्रपटांची क्रेझ पाहायला मिळते. अनेक सिनेमे हे हिंदीमध्ये डब होऊन प्रदर्शित होताना दिसतात. तसेच बॉक्स ऑफिसवर देखील साऊथचे सिनेमे सर्वाधिक कमाई करताना दिसतात. पण बॉलिवूडमधील कोणताही सिनेमा फारशी कमाई करत नसल्याचे दिसत आहे. अशात बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने यामागचे कारण सांगितले आहे. चला जाणून घेऊया कंगना नेमकं काय म्हणाली…








