मागील निवडणुकीत आम्ही शिवसेना भाजप युतीसाठी लोकांकडे मते मागितली होती. मात्र सत्ता आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी खोटं बोलून शिवसेना-भाजपा युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादीशी गाठ बांधली होती. सत्ता मिळाल्यावर तेव्हा स्वतः टूणकन उडी मारून मुख्यमंत्री झाले, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच त्यावेळी जर मी वेगळा निर्णय घेतला नसता तर आता शिवसेना दिसली नसती, असाही दावा केला.






