
भारताच्या या कारवाईनंतरही दहशतवादाला आश्रय देणारा पाकिस्तान आपल्या कारवायांपासून मागे हटत नसून सीमेवर जोरदार गोळीबाराबरोबरच अनेक ठिकाणी क्षेपणास्त्र हल्ले करण्याचा प्रयत्न केला आहे. संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ७ आणि ८ मे च्या रात्री पाकिस्तानने उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक लष्करी आस्थापनांना क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये अवंतीपोरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना आणि भुज यांचा समावेश आहे. मात्र, भारताची हवाई संरक्षण यंत्रणा एस-४०० आणि इस्रायली हार्पी ड्रोनने पाकिस्तानी क्षेपणास्त्रे आणि ड्रोन नष्ट केले.