Sukh Mhanje Nakki Kay Asta: छोट्या पडद्यावर सध्या चर्चेत असलेल्या मालिकांमध्ये ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेचे नाव देखील अग्रक्रमी आहे. एका श्रीमंत घरात काम करण्यापासून सुरू झालेला गौरीचा प्रवास त्याच घराची मालकीण बनण्यापर्यंत कथा मालिकेत दाखवण्यात आली आहे. जयदीप-गौरी प्रमाणेच नित्या आणि अधिराज ही जोडीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मालिकेत नव्या कथानकासोबत अनेक नवी पात्रही भेटीला आली आहेत. मात्र ज्या पात्राला गेल्या कित्येक दिवसांपासून प्रेक्षकांना पहायचे होते त्या शालिनी शिर्के-पाटीलची लवकरच मालिकेत एण्ट्री होणार आहे. त्यामुळे मालिकेत रंजक वळण आले आहे.








