Thursday, August 27, 2026
Homeमनोरंजनसायलीचं कौतुक होणार; रविराजही माफी मागणार! ‘ठरलं तर मग’ मालिकेत आज काय...

सायलीचं कौतुक होणार; रविराजही माफी मागणार! ‘ठरलं तर मग’ मालिकेत आज काय घडणार? वाचा…

सायलीचं कौतुक होणार; रविराजही माफी मागणार! ‘ठरलं तर मग’ मालिकेत आज काय घडणार? वाचा…

[ad_1]

महिपत खोटं बोलतोय हे सगळ्यांना पटवून देण्यासाठी अर्जुन आणि सायली प्रचंड मेहनत घेत होते. अर्जुनने आपल्या वडिलांची केस लढवून, त्यांना निर्दोष मुक्तता मिळवून दिली. मात्र, घरी आल्यानंतर आता हे सगळं कसं घडलं, हे सगळ्यांना जाणून घ्यायचं होतं. यावेळी अर्जुन आणि सायली सगळी घटना सुभेदार कुटुंबांला सांगणार आहे. तर, रविराज देखील माफी मागून आपण ही केस अर्जुनच्या हातात का दिली, या मागचं कारण सांगणार आहे. ‘मी प्रतापची केस लढवत होतो. मात्र, त्यावेळी अर्जुन माझ्या ऑफिसमध्ये आला आणि त्यावेळी त्याच्याकडे काही पुरावे होते. हे पुरावे पाहिल्यानंतर मला धक्का बसला होता. ज्या महिपतवर मी इतका विश्वास ठेवला होता, त्यानेच या सगळ्या गोष्टी केल्याचं लक्षात आल्यानंतर मला खूप राग आला. मात्र, या केससाठी लागणारे सगळे महत्त्वाचे पुरावे हे अर्जुनने मेहनतीने गोळा केल्यामुळे, ही केस देखील त्यानेच लढवली पाहिजे, हे माझं मत होतं आणि म्हणूनच मी प्रतापची केस अर्जुनच्या हातात सोपवली’, असं रविराज म्हणणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments