
शिवाजी पार्कसाठी दोन पक्षांमधीस संघर्ष नवा नाही. याआधी २००९ च्या लोकसभा निवडणुकीतही अशाच प्रकार शिवसेना व मनसेमध्ये चढाओढ लागली होती. दोन्ही पक्षांनी यासाठी अर्ज केले होते. मात्र त्यावेळीही मनसेने पहिल्यांदा अर्ज केल्याने सभेसाठी त्यांना मैदान दिले होते. आता १७ मे रोजी शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचा आवाज घुमणार की, राज ठाकरेंची तोफ धडाडणार, याची उत्सुकता आहे.



