
आम्ही भारतातील २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे. शाश्वत विकास कसा यशस्वी होऊ शकतो, हे आम्ही दाखवून दिले आहे. यशाचा हा अनुभव जगासोबत शेअर करण्यास आम्ही तयार आहोत. मानवतेचे खरे यश आपल्या सामूहिक सामर्थ्यात, युद्धभूमीवर नाही. जागतिक शांतता आणि विकासासाठी जागतिक संस्थांमधील सुधारणा महत्त्वाच्या आहेत. जगात तीन ठिकाणी युद्धाचा भडका उडाल्याच्या पार्श्वभूमीवर मोदींनी हे विधान केले आहे.