
महाराष्ट्रातनिवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आला असून गाठीभेटी, रोड शो, प्रचारसभांना चांगलाच जोर आला आहे. प्रचारासाठी शेवटचे चार दिवस शिल्लक राहिल्याने तसेच त्यातील तीन दिवस सुट्टीचे असल्याने प्रचाराचा धुरळा उडणार आहे. शरद पवारांची आज इचलकंरजी येथे जाहीर सभा झाली. मात्र सभा सुरू होताच जोरदार पावसास सुरूवात झाली.महाराष्ट्राचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे. माझा, जाहीर सभेचा आणि पावसाचा काही संबंध नाही. परंतु पावसाच्या सभेत मीभाषण केल्यानंतर निकाल चांगला लागेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.