
राज्य सरकारचा महत्वाकांक्षी समृद्धी महामार्गानंतर महाराष्ट्र सरकारने राज्यात शक्तीपीठ (Shaktipeeth Mahamarg), भक्तिपीठ (Bhaktipeeth Mahamarg) आणि औद्योगिक महामार्गाचे काम सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. तीनही महामार्गांच्या भूसंपादनाला सुरूवात झाली आहे. मात्र स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोधानंतर सरकारने शक्तीपीठ महामार्गाचे भूसंपादन थांबवले होते. आता सरकारने भक्तिपीठ आणि औद्योगिक महामार्गाचे भूसंपादनाला ब्रेक लावला आहे. शेतकऱ्यांच्या विरोधात जाऊन सरकार कोणताही महामार्ग लादणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी आधीच जाहीर केले होते, त्यानुसार आता सरकारने तिन्ही महामार्गांचे भूमिअधिगृहण थांबवलं आहे.