विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! गणित, विज्ञान विषयात नापास झाले तरी मिळणार अकरावीत प्रवेश; शिक्षणतज्ञांनी केले स्वागत

0
1
विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! गणित, विज्ञान विषयात नापास झाले तरी मिळणार अकरावीत प्रवेश; शिक्षणतज्ञांनी केले स्वागत


SSC Exam New Rule : गणित आणि विज्ञान विषयांची अनेकांना धास्ती असते. यात नापास होणाऱ्यांचे प्रमाण मोठे असते. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. आता इयत्ता दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना यापुढे गणित आणि विज्ञान या विषयांमध्ये ३५ ऐवजी २० किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळाले तरी त्यांना अकरावीत प्रवेश मिळणार आहे. महाराष्ट्र बोर्डाने राज्य शालेय शिक्षण आराखड्यात (एससीएफ-एसई) नमूद केलं आहे की, गणित आणि विज्ञात विषयात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना हे दोन विषय सोडून इतर शाखांमध्ये प्रवेश घेता येणार आहे.



Source link