लोकसभेच्या निकालातून भाजप धडा घेईल असं वाटलं होतं, पण…; सोनिया गांधी यांचा जोरदार हल्लाबोल

0
3
लोकसभेच्या निकालातून भाजप धडा घेईल असं वाटलं होतं, पण…; सोनिया गांधी यांचा जोरदार हल्लाबोल


काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीला संबोधित करताना त्या बोलत होत्या. केंद्रीय अर्थसंकल्प, मणिपूर हिंसाचार, जात गणना आणि जम्मू-काश्मीरमधील अलीकडील हल्ल्यांसह विविध मुद्द्यांवरून त्यांनी केंद्र सरकारला धारेवर धरलं. ‘मोदी सरकार गोंधळलेलं आहे. लोकसभेच्या निकालातून मोदी सरकार योग्य तो धडा घेईल, अशी आम्हाला आशा होती. पण तसं झालेलं दिसत नाही. ते लोकांमध्ये फूट पाडण्याचं आणि शत्रुत्वाचं वातावरण पसरवण्याचं काम करतच आहेत. सरकार कसं चाललं आहे हे काही उदाहरणांवरून कळेल. सरकारी पदांवर काम करणाऱ्यांना RSS च्या कार्यात सहभागी होण्याची परवानगी देण्यासाठी अचानक नियम बदलण्यात आले आहेत. आरएसएस स्वत:ला सांस्कृतिक संघटना म्हणवून घेते, मात्र, ही संघटना भाजपचा राजकीय आणि वैचारिक पाया आहे हे संपूर्ण जगाला माहीत आहे, असं सोनिया गांधी म्हणाल्या.



Source link