
मुंबईत झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली. राज्यातील राजकीय परिस्थिती विचित्र आहे. कोण कुठल्या पक्षात आहे हेच कळत नाही. येत्या निवडणुकीत ह्या सगळ्या राजकीय पक्षात जे काही घमासान होणार आहे, ते न भूतो भविष्यती असेल, असं ते म्हणाले. मात्र, महाराष्ट्राचे प्रश्न हेच आपल्या पक्षाचे प्रचाराचे मुद्दे असतील, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.