यूपीएससी करणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थिनीची दिल्लीत आत्महत्या; आर्थिक विवंचना आणि तणावातून उचललं टोकाचं पाऊल

0
3
यूपीएससी करणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थिनीची दिल्लीत आत्महत्या; आर्थिक विवंचना आणि तणावातून उचललं टोकाचं पाऊल


अंजली अनिल गोपनारायण असे या तरुणीचे नाव असून ती अकोल्यात गंगानगर भागात राहत होती. तिने दिल्लीत शनिवारी हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. अंजलीच्या मृत्यूमुळे दिल्लीत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची होणाऱ्या फसवणुकीचा आणि पिळवणुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तिने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये तिने गंभीर बाबींवर प्रकाश टाकला आहे. परीक्षेचा अभ्यासाचा तणाव, शिकवणी वर्गाचा खर्च, घर मालकांनी तसेच वस्तीगृह चालकांनी वाढवलेले भाडे व घर शोधून देणारी दलाले यांच्याकडून होणाऱ्या आर्थिक पिळवणुकीवर तिने प्रकाश टाकला आहे.



Source link