
सीजेआय चंद्रचूड यांनी म्हटले की, संसदेकडून या कायद्यांना मंजुरी मिळणे, या गोष्टीचे स्पष्ट संकेत आहेत की, भारत बदलत आहे व ही प्रक्रिया पुढेही सुरुच राहील. सध्याच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी नव्या काद्यांची गरज आहे. चंद्रचूड म्हणाले की, नवे कायदे तेव्हाच यशस्वी होतील, जेव्हा यांना लागू करण्याची जबाबदारी सांभाळणारे याचा स्वीकार करतील.या संमेलनात केंद्रीय कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल,अटॉर्नी जनरल आर वेंकटरमणी आणि सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आदी उपस्थित होते.