
गेल्या जवळपास १४ वर्षापासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. या महामार्गाच्या कंत्राटदार कंपनीवर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत या प्रकरणात पहिली अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या आदेशानंतर ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे.