
Maharashtra Ministers Bungalow : विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळूनही व खातेवाटप होऊनही मंत्र्यांमध्ये नाराजीनाट्य हे सुरूच आहे. सध्या नाराजीचा नवा अंक समोर आला आहे. नाराजीचे कारण ऐकून तुम्ही देखील डोक्यावर हात मारून नेमकं चाललंय काय असे म्हणालं. सोमवारी नवीन मंत्र्यांना बंगले आणि दालनाचे वाटप करण्यात आले. मात्र, त्यांना मनाप्रमाणे व वाटप करण्यापूर्वी विश्वासात घेतले नसल्याने अनेक मंत्री हे नाराज असल्याची बाब पुढे आली आहे. या बाबत त्यांनी पक्षनेत्यांकडे तक्रारी देखील केल्या असून बंगले व दालन वाटपात पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे.





