
नरेंद्र मोदींच्या अमृतकालात सर्वसामान्य भारतीयांचे रिकामे खिसेही कापले जात आहेत. उद्योगपतींचे १६ लाख कोटी रुपये माफ करणाऱ्या सरकारने किमान शिल्लक ही ठेवू न शकणाऱ्या गरीब भारतीयांकडून ८,५०० कोटी रुपये गोळा केले आहेत. ‘पेनल्टी सिस्टीम’ हे मोदींच्या चक्रव्यूहाचे दार असून त्याद्वारे सर्वसामान्य भारतीयांचे कंबरडे मोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण लक्षात ठेवा, भारतातील जनता अभिमन्यू नाही, अर्जुन आहे, चक्रव्यूह तोडून तुमच्या प्रत्येक अत्याचाराला कसे उत्तर द्यायचे हे त्यांना माहित आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.