
भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, आसामचे मुख्यमंत्री हिमंत सरमा यांनी तेथे असलेल्या एका हिंदू मंदिराचा उल्लेख करत ते सनातन धर्माचे अत्यंत महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असल्याचे म्हटले आहे. बलुचिस्तान हिंदूंसाठी ऐतिहासिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे, कारण येथे असलेले हिंगलाज मातेचे मंदिर ५१ पवित्र शक्तीपीठांपैकी एक आहे.