- Marathi News
- Opinion
- Pt. Vijayshankar Mehta’s Column, After Going To The Guru, You Will Be Reborn, Have Faith
23 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
शास्त्रांमध्ये लिहिले आहे – ‘आचार्यो मृत्यु:’ म्हणजेच तुम्ही गुरूकडे गेल्यावर मृत्यू होतो. अर्थात गुरूच्या सान्निध्यात आपण आहोत तसेच राहत नाहीत व आपण असायला हवे तसे घडतो. हा पुनर्जन्म आहे. गुरूची शक्ती अशी आहे की प्राणी आणि पक्षीदेखील आदराच्या भावनेने गुरूसमोर नतमस्तक होतात.
शिवजी पार्वतीजींना सांगत होते काकभूशुंडी कथा सांगत तेव्हा पक्षी त्यांच्या दाराशी येत – ‘बर तर कह हरि कथा प्रसंगा। आवहिं सुनही अनेक बिहंगा।’ ते वडाच्या झाडाखाली श्री हरीच्या कथा सांगत. तेव्हा पक्षी तिथे गोळा हाेऊन कथा ऐकत असत.
हे काकभूशुंडीजींसाठी सांगितले गेले. आपण गुरुकडे गेलो तर ते आपल्याला हरिकथा सांगतात. ती गुरुमंत्राच्या स्वरूपात असली तरी. प्राणी आणि पक्ष्यांना गुरूची भाषा समजते. आपण तर मानव आहोत. म्हणून गुरूंच्या सान्निध्यात जाल तेव्हा गुरू तुम्हाला नवीन जन्म देतील. अहंकार गळून पडावा. अन्यथा कधीही बदल होणार नाही.




