
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाला पुन्हा बळ देण्याचा प्रयत्न केला जात आहे, पण केंद्रशासित प्रदेशात दहशतवाद इतका खाली गाडला जाईल की तो कधीच बाहेर येणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी म्हटले. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नुकत्याच झालेल्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावरही निशाणा साधताना शहा म्हणाले की, एनडीए सरकारने हा प्रदेश सुरक्षित केल्यामुळे विरोधी पक्षाचे नेते तेथे आईस्क्रीम खात आहेत आणि दुचाकी चालवत आहेत.







