
देशात वंदे भारत ट्रेन खूपच लोकप्रिय होत आहे. सध्या देशभरात ६६ मार्गावर वंदे भारत ट्रेन धावत आहेत. १६ सप्टेंबर रोजी सुरू करण्यात आलेल्या नागपूर-सिकंदराबाद वंदे भारतला प्रवाशांचा कमी प्रतिसाद मिळत असल्याचे तसेच ८० ट्क्के गाडी रिकामीच धावत असल्याचे समोर आले आहे. यामुळे ही एक्सप्रेस कायमची रद्द केली जाण्याची किंवा २० बोगींवरून ही गाडी ८ बोगींची केली जाण्याची चर्चा सुरू असतानात आता ही गाडी दोन दिवस रद्द केल्याची माहिती समोर आली आहे.