
ठरलं तर मग
२०२४च्या २०व्या आठवड्यात पुन्हा एकदा ‘ठरलं तर मग’ या मालिने पहिला नंबर पटकावला आहे. या मालिकेला ६.७चा टीआरपी रेटिंग मिळाला असून मालिकेने प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं आहे. या मालिकेत सध्या सायली आणि अर्जुन यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा वेळ संपत आल्याचे दाखवण्यात आले आहे. कॉन्ट्रॅक्ट संपल्यामुळे सायली आणि अर्जुन यांना आता एकमेकांपासून वेगळं व्हावं लागणार आहे. मात्र, याच दरम्यान मालिकेतील ट्वीस्ट येणार आहे.







