
‘एअर इंडिया एक्सप्रेस’ च्या एका विमानात शुक्रवारी सकाळी उड्डाण भरल्यानंतर धूर येऊ लागला. त्यानंतर याचे तिरुवनंतपुरम विमानतळावर सुरक्षित लँडिंग करण्यात आले. विमान कंपनी आणि विमान तळाच्या सूत्रांनी ही माहिती दिली. मस्कतला जाणाऱ्या विमानातून धूर निघत असल्याचा इशारा सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मिळाला होता.