
मुंबईतील चेंबूरच्या आरसीएफ परिसरात भीषण अपघात झाला आहे. भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यातच दोन वेळी पलटी होऊन रस्त्याकडेला थांबलेल्या टँकरवर आदळली. या अपघातात कारमधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर ३ जण गंभीर आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात रविवारी दुपारच्या सुमारास घडला.