
Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशातील बहराइचमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जिथे एका तरुणाने दुचाकीची चावी दिली नाही म्हणून पेटवून घेतले. घरच्यांनी आरडाओरडा केल्यानंतर शेजारच्या लोकांनी ब्लँकेट टाकून आग विझवली. मात्र, तोपर्यंत संबंधित तरुणाच्या शरीराचा ६० टक्के भाग भाजला. भाजलेल्या अवस्थेत शेजारच्या लोकांनी त्याला वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. ही घटना शनिवारी रात्री घडली असून तरुणाच्या या कृत्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला.