
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी वाढत्या लोकसंख्येवर भाष्य करत लाडक्या बहिणींना प्रेमळ सल्ला दिला आहे. अल्ला किंवा देवाच्या कृपेने मुलं होत नाहीत तर नवऱ्याच्या कृपेने मुलं-बाळं होतात, त्यामुळे दोनवरच थांबा.पुण्यातील मावळमध्ये राष्ट्रवादीचा जनसन्मान यात्रेत महिला मेळावा पार पडला. यावेळी महिलांना संबोधित करताना अजित पवारांनी हे वक्तव्य केले. अजित पवारांच्या वक्तव्याने सभास्थळी एकच हशा पिकला.