
मनोरंजन विश्व असो किंवा जगात घडणारी कुठलीही छोटी-मोठी गोष्ट, अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सगळ्याच बातम्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माध्यम प्रतिनिधी आणि पत्रकार प्रचंड मेहनत घेत असतात वेळे प्रसंगी भर पावसात, पुराच्या पाण्यात ते अगदी कडाक्याच्या थंडीत अन् रणरणत्या उन्हात देखील पत्रकार बंधू प्रत्येक घडामोडींना सामान्य माणसांपर्यंत पोहोचवत असतात. अगदी तुमच्या भागात घडलेली एखादी घटना असो, वा आंतरराष्ट्रीय पातळीवर घडलेली एखादी मोठी घटना असो, ती तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचवण्याचा काम पत्रकार करत असतात. मात्र, या पत्रकारांना त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी एखादं हक्काचं असं कल्याणकारी मंडळ असायला हवं, अशी मागणी सध्या ‘मीडिया असोशिएशन ऑफ इंडिया’कडून म्हणजेच ‘माई’कडून केली जात आहे. ‘माई’च्या शीतल करदेकर यांनी ‘माध्यमकर्मी कल्याणकारी मंडळा’साठी आमरण उपोषण सुरू केले आहे.