
अप्पी आणि अर्जुनच्या गाडीचा अपघात
घरातील सगळे अप्पी, अर्जुन आणि अमोल आता एकत्र राहत असल्याने, देव दर्शनासाठी आणि फिरायला जाण्यासाठी मागे लागतात. अप्पी, अर्जुन आणि अमोल फिरायला गेले असताना मनी गाडीचा ब्रेक फेल करते ज्यांनी त्यांच्या गाडीचा ऍक्सीडेन्ट होते. अर्जुन अमोलला वाचवतो पण अप्पी गाडीतच अडकते. अप्पीला अर्जुन वाचवू शकेल ? की अमोलाचं आपल्या आई-बाबांना एकत्र पाहायचं स्वप्न अपूर्ण राहील ? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. मालिकेच्या आगामी भागात त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.