
Bollywood Filmy Kissa : बॉलिवूडचा ज्युनिअर बच्चन अर्थात अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या लग्नाची धामधूम आजही लोकांच्या लक्षात आहे. ऐश्वर्या आणि अभिषेकने २० एप्रिल २००७ रोजी लग्न केले होते. या लग्नाला बच्चन कुटुंबीय आणि काही जवळचे मित्र उपस्थित होते. मात्र, या शाही लग्न सोहळ्यात अनेक बॉलिवूड स्टार्सचा पाहुण्यांच्या यादीत समावेश नव्हता. यामुळे अनेक कलाकार नाराज झाले होते. लोकांची नाराजी दूर करण्यासाठी बच्चन कुटुंबीयांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना खास शाही मिठाई पाठवली होती. ज्यांना ते लग्नाला बोलावू शकले नाहीत, त्यांनाच ही मिठाई पाठवण्यात आली होती. पण एका पाहुण्याने आपली मिठाई परत केली होती. ते कोण आहेत आणि त्यांनी असे का केले हे जाणून घेऊया..