
सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन जणांनी बलात्कार केल्यानंतर एका महिलेने टोकाचं पाऊल उचललं आहे. मंगळवेढ्याच्या ग्रामीण भागात ही घटना घडली. एका विवाहित महिलेवर तीन मित्रांनी बलात्कार करून याची वाच्याता कुठे केल्यास तिच्या दोन मुलांना ठार मारण्याची धमकी आरोपींनी दिली होती. यानंतर महिलेने गावातील तलावात उडी मारून आपलं जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे.