भाचीनं पळून जाऊन लग्न केलं, नाव खराब झाल्यामुळं संतापलेल्या मामानं वऱ्हाड्यांच्या जेवणात विष मिसळलं! कोल्हापूर हादरलं!

0
2
भाचीनं पळून जाऊन लग्न केलं, नाव खराब झाल्यामुळं संतापलेल्या मामानं वऱ्हाड्यांच्या जेवणात विष मिसळलं! कोल्हापूर हादरलं!


Kolhapur News : कोल्हापुरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भाचीने पळून जाऊन गावातील एका मुलीशी लग्न केल्याने बदनामी होईल या भीतीने थेट लग्नाच्या जेवणात विष मिसळलं. ही घटना आचाऱ्याचा लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर आरोपी मामा फरार झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी मामाचा शोध घेतला जात आहे. ही घटना पन्हाळा तालुक्यातील उत्रे गावात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महेश ज्योतीराम पाटील असं आरोपी मामाचे नाव आहे.



Source link