
७-८ मे च्या मध्यरात्री पाकिस्तानने अवंतीपोरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज सह उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक लष्करी तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून हल्ले करण्याचा प्रयत्न केला. हे हल्ले काउंटर यूएएस ग्रिड आणि एअर डिफेन्स सिस्टीमने निष्प्रभ केले. या हल्ल्यांचे अवशेष आता अनेक ठिकाणांहून सापडत आहेत, ज्यावरून पाकिस्तानी हल्ले सिद्ध होतात.








