परिवहन खात्याकडून मॅजिक स्कूल बसला मान्यता, मुलांसाठी काय असणार खास? जाणून घ्या!

0
1
परिवहन खात्याकडून मॅजिक स्कूल बसला मान्यता, मुलांसाठी काय असणार खास? जाणून घ्या!


Magic School Bus: जूनमध्ये शाळा सुरु होण्याआधी परिवहन खात्याने मॅजिक स्कूल बसला मंजुरी दिलीय. मुलांच्या सुरक्षेसाठी परिवहन खात्याने या नव्या स्कूल बसला मान्यता दिली. मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व व्यवस्था या मॅजिक स्कूल बसमध्ये करण्यात आल्यात.

भारतातील पहिली ais 204 धर्तीवर बनवलेली सेफ्टी स्कुल बस तयार झालीय. ही स्कूल बस 9 सीटर असेल. यावर्षीपासून तुम्हाला त्या शाळेच्या बाहेर दिसतील. 

कशी असेल मॅजिक स्कुल बस?

याआधी 6 सीटर बस होती आता ही बस 9 सीटर बस असेल. 

या बसमध्ये सीसीटीव्ही असणार आहेत.

ही बस पेट्रोल व सीएनजी या दोन्हीवर चालेल. 

या बसमध्ये एक पॅनिक बटन देण्यात आले आहे. त्या बस मधल्या कोणत्याही विद्यार्थ्यांनी ते बटण दाबल्यावर थेट त्याचा अलर्ट आरटीओ कंट्रोल रूम ला मिळणार आहे. त्यामुळे ही बस ट्रेक करू शकतो.

या बसचा 40 च्या वर स्पीड लॉक आहे.

या बस मध्ये दरवाजा बंद झाला नाही तर अलार्म सिस्टम वाजणार आहे. 

या बसमध्ये रिवस गेर कॅमेरा ही लावण्यात आलाय.

बसमध्ये प्राथमिक उपचार पेटी सहित अग्नी सुरक्षा यंत्रणाही आहेत.

महाराष्ट्रातील शाळांमध्ये CBSE पॅटर्न

आगामी शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू करण्यात येणार आहे. शालेय शिक्षणमंत्री दादा भूसे यांनी ही घोषणा केलीय. दरम्यान यासाठी शिक्षकांना योग्य ते प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचं देखील दादा भुसे यांनी सांगितलं.. मात्र, सीबीएसईची घोषणा करताना अगोदर सर्व व्यवस्था करणं गरजेचं असल्याचं विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय. दादा भूसे यांनी केलेल्या घोषणेनंतर जितेंद्र आव्हाडांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. सीबीएसई पॅटर्नमुळे मराठी मातीचा इतिहास पुसला जात असेल तर या पॅटर्नची गरज काय असा सवाल त्यांनी केला. दरम्यान या सीबीएसई पॅटर्नमुळे मराठी आणि इतिहासासोबत कोणतीही तडजोड केली नसल्याचं आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेंनी म्हटलंय. सीबीएसई पॅटर्नची घोषणा केल्यानंतर शिक्षक आणि पालक देखील संभ्रमात पडले आहेत. अचानक करण्यात आलेला बदल विद्यार्थ्यांना झेपणार का? तसंच शिक्षकांच्या प्रशिक्षणाचं काय? असे अनेक प्रश्न पालकांकडून उपस्थित करण्यात येताय.

दरवर्षी एकेक इयत्तेचा अभ्यासक्रम बदलला जाणार

राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात  70 टक्के – 30% फॉर्म्युला राबवला जाणार आहे. यामध्ये 70 टक्के सीबीएससी तर 30 टक्के राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असणार आहे. भाषा आणि इतिहास विषयाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी माहिती  शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी दिली.सीबीएससी अभ्याक्रमातील इतिहास विषयात राज्य शिक्षण मंडळाच्या अखत्यारितील 30% मध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, ताराराणी आणि मराठा साम्राज्याचा इतिहास शिकवला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यावर्षी पहिली इयत्तेला सीबीएससी अभ्यासक्रम असेल त्यानंतर दरवर्षी एकेक इयत्तेचा अभ्यासक्रम बदलला जाणार आहे. नव्या अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके छापण्याची जबाबदारी राज्य शिक्षण मंडळाची असणार आहे. 1 जूनला शाळा सुरू झाल्यानंतर लगेच शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.





Source link