अभिरामचं लग्न मोडण्यामागचं सत्य कुणाला कळू शकेल का? ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत ट्वीस्ट

0
91
अभिरामचं लग्न मोडण्यामागचं सत्य कुणाला कळू शकेल का? ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत ट्वीस्ट


लीलाला गुंडांच्या तावडीतून सोडवून निघालेला अभिराम आता घरी येऊन थेट लग्न मोडल्याचे म्हणतो. तर, आपल्याला लीलाशी लग्न करायचं नाही, असे देखील तो म्हणतो. दुसरीकडे अभिरामने आपल्या मुलीशी ठरलेलं लग्न मोडून, तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, असा आरोप कालिंदी त्याच्यावर करत आहे. ‘हे लग्न मोडल्यामुळे लीलाचं आयुष्य तर बरबाद झालं, मात्र माझ्या लहान मुलीचं आयुष्य देखील उद्ध्वस्त होईल. त्यामुळे तुम्ही याच्यात लक्ष घाला आणि अभिरामला हे लग्न करण्यासाठी तयार करा’, असं अशी विनवणी कालिंदी आजीकडे करताना दिसली. मात्र, लक्ष्मी, दुर्गा आणि सरस्वती यांनी मध्ये पडून कालिंदीला चांगलेच सुनावले. इतकंच नाही तर, त्यांनी कालिंदीचा अपमान देखील केला.



Source link