
gadchiroli news: गडचिरोली येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तापाच्या उपचारासाठी डॉक्टरऐवजी पुजाऱ्याकडे गेलेल्या दोन चिमुकल्या भवांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ऐवढेच नाही रुग्णवाहिका नसल्याने या मुलांना कडेवर घेऊन जातांना या दोन्ही मुलांनी जीव सोडला. तब्बल १५ किमी चालत जाऊन आई वडिलांनी दवाखाना गाठला. मात्र, तो पर्यंत उशीर झाला होता. दोन्ही चिमूकल्यांनी प्राण सोडले होते. ही घटना बुधवारी अहेरी तालुक्यातील पत्तीगाव येथे घडली असून या आई वडिलांचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.