साक्षीच्या खेळीने फिरवला डाव; चैतन्य-अर्जुनवर नवं संकट कोसळणार! ‘ठरलं तर मग’मध्ये शॉकिंग ट्वीस्ट

0
16
साक्षीच्या खेळीने फिरवला डाव; चैतन्य-अर्जुनवर नवं संकट कोसळणार! ‘ठरलं तर मग’मध्ये शॉकिंग ट्वीस्ट


इतके दिवस चैतन्य आपल्या बाजूनेच आहे, असं समजणाऱ्या साक्षीला आता चैतन्याचा खरा डाव कळला आहे. चैतन्य आणि अर्जुन मिळून काहीतरी प्लॅन करत असून, यामध्ये ते आपल्याला अडकवत असल्याचं आता साक्षीच्या लक्षात आलं आहे. महिपतच्या सांगण्यावरून आता साक्षीनं चैतन्यवर ताशेरे उडावायला सुरुवात केली आहे. चैतन्य हा आपला माणूस नाही, हे महिपतने साक्षीला दाखवून दिले. त्यामुळे आता साक्षीने एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन चैतन्य आणि अर्जुनवर वेगवेगळे आरोप केले. दोघांनीही मिळून आपली फसवणूक केल्याचं तिने यात म्हटलं आहे. तर, आपल्याला फसवून चैतन्यने साखरपुडा केल्याचा आरोप देखील तिने केला आहे.



Source link