
Bus Accident: ताम्हिणी घाटात वॉटरफॉल पॉईंटजवळ भीषण अपघात घडल्याची घटना उघडकीस आली आहे. एका प्रवासी ट्रॅव्हल्सचा ताबा सुटल्याने ती पलटी झाली असून या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ३५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ट्रॅव्हल्समध्ये काही प्रवासी अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. ही ट्रॅव्हल्स चाकणवरून वीरवाडीला (महाड), लग्नाला चालली होती.




