राज्यात मतदानाचा टक्का वाढला! एकूण ६६.५ टक्के मतदानाची नोंद; वाढलेलं मतदान कुणाच्या पथ्यावर पडणार?

0
1
राज्यात मतदानाचा टक्का वाढला! एकूण ६६.५ टक्के मतदानाची नोंद; वाढलेलं मतदान कुणाच्या पथ्यावर पडणार?


Maharashtra Assembly Elections : राज्यात या वर्षी मतदानाचा टक्का वाढला आहे. राज्यात एकूण ६६.५ टक्के मतदान झाले असून गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मतदान ५ टक्यांनी वाढले आहे.  मुंबई शहरात ५२.६५ टक्के तर  मुंबई उपनगरात ५६.३९ टक्के मतदान झाले आहे. तर सर्वात कमी मतदान हे मुंबई शहरातील कुलाबा येथे ४४.४४ एवढे झाले आहे. तर सर्वाधिक मतदान हे  कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर येथे झाले आहे. या ठिकाणी तब्बल ८४.९६ टक्के मतदान झाल्याची नोंद झाली आहे. दरम्यान,  वाढलेले मतदान कुणाच्या पथ्यावर पडणार हे उद्या मतमोजणी नंतर स्पष्ट होणार आहे.  भरघोस मतदान झाल्याने सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विजयाचा दावा केला आहे.  



Source link