
घरोघरी मातीच्या चुली
नव्याने सुरू झालेली ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेत सध्या ऐश्वर्या आणि सौमित्र यांच्या लग्नाची लगबग पाहायला मिळत आहे. एकीकडे रणदिवे कुटुंब या लग्नासाठी आनंदात असताना, आता जानकी समोर एक वेगळंच सत्य आलं आहे. सौमित्रचं अवंतिका नावाच्या एका मुलीवर प्रेम होतं. मात्र, तरीही त्याने ऐश्वर्यासोबत लग्नाला होकार दिला आहे. आता अवंतिका जानकीकडे येऊन तिची मदत मागणार आहे. मी सौमित्र शिवाय जगू शकत नाही, असं म्हणत अवंतिका जानकीकडे विनवणी करणार आहे. मात्र, जानकी आता पुढे काय निर्णय घेणार हे प्रेक्षकांना मालिकेच्या येत्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. सध्या या मालिकेने टीआरपी शर्यतीतलं आपलं पाचवं स्थान टिकवून ठेवलं आहे.