Ajit Pawar : सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये सहन होणार नाहीत अशा प्रकारची वक्तव्य फक्त एकाच बाजूने नव्हे, तर दोन्हीकडून होत आहेत आणि ते महाराष्ट्राला परवडणार नाही अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कराडमध्ये प्रीती संगमावरून राज्यातील वाचाळांना कानपिचक्या दिल्या. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अडचणीत येणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे, असा टोला सुद्धा अजित पवार यांनी लगावला. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त अजित पवार यांनी प्रीतीसंगमावर जाऊन समाधीस्थळी दर्शन घेतले. यावेळी बोलताना अजित पवार यांनी राजकीय वाचाळवीरांना फटकारले.
यशवंतरावांच्या विचारधारनेचं भलं होणार
अजित पवार म्हणाले की यशवंतराव चव्हाण आणि त्यांच्यानंतर ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व केलं त्यांनी जातीय सलोखा ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही जाती जातीमध्ये समाजामध्ये भेदभाव केला नव्हता. या सगळ्या बाबी विचारात घेऊनच आम्ही अर्थसंकल्प मांडल्याचे अजित पवार म्हणाले. जोपर्यंत मी राजकीय जीवनामध्ये आहे तोपर्यंत यशवंतराव चव्हाण यांचे राजकीय विचार सोडणार नसल्याचे त्यांनी सांगितले. चव्हाण यांच्या विचारधारेनेच महाराष्ट्राचे भलं होणार असल्याचे ते म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की दोन्ही बाजूचे सन्माननीय सदस्यांनी कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
आज, कराड येथे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार तथा पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जयंतीनिमित्त प्रीतिसंगम याठिकाणी त्यांच्या समाधी स्थळावर पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. pic.twitter.com/YpBalxgXXn
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) March 12, 2025
मंत्री कोणाला करणार? अजित पवारांनी बोलणं टाळलं
देशासह महाराष्ट्रावर प्रेम करणारा मोठ्या संख्येने मुस्लिम समाज देखील आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसोबत देखील मुस्लिम मावळे होते. त्यामुळे नितेश व्यक्त नितेश राणे यांचे वक्तव्य काय होतं, त्या मागचा हेतू काय होत आहे मला माहित नसल्याचं अजित पवार म्हणाले. दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या जागी मग कोणाला मंत्री आहात काय केलं जाणार याबाबतीत मात्र अजित पवार यांनी बोलणं टाळलं.
सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा सर्वच अंगांनी विकासाची पायाभरणी करणारे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार तथा पहिले मुख्यमंत्री व लोकप्रिय नेते स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! कृषी क्षेत्रात आणि औद्योगिकीकरणात आज महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे, ते… pic.twitter.com/QkjPCEBx51
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) March 12, 2025
अधिक पाहा..