
हा अपघात झाला तेव्हा बोगी रेल्वे पासून वेगळी होऊन ती मुंबईच्या दिशेने पुढे गेली. कपलिंग तुटल्याने इंजिन व एक डब्बा वेगळा झाला. मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेस ने कसारा स्थानक सोडल्याच्या काही अंतरावर ही दुर्घटना घडली. कसारा स्थानकाजवळ पंचवटी एक्सप्रेसचे कपलींग तुटले, एका तासापासुन मुंबई कडे जाणारी वाहतूक विस्कळित झाली होती, रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी आल्यावर त्यांनी तातडीने दुसरुस्तीचे काम हाती घेतले. यानंतर सकाळी ९.५० च्या आसापास या मार्गावरची वाहतूक ही सुरुळीत करण्यात आली.




