
Mumbai Local Trains News: कल्याणहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी वाहतूकदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाली. परिणामी, जलद आणि धीम्या दोन्ही मार्गावरील गाड्या उशीराने धावत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, सकाळी कामाला जाण्याच्या वेळेस मध्य रेल्वेचा मोठा खोळंबा झाल्याने स्थानकांवर मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे.