
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन यांनी सांगितले की, देशातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी १० उपग्रह २४ तास सतत देशावर लक्ष ठेवून आहेत. मणिपूरची राजधानी इम्फाळ येथील केंद्रीय कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला संबोधित करताना ते म्हणाले की, भारत ‘लिव्हिंग स्पेस पॉवर’ बनत आहे आणि २०४० पर्यंत देशातील पहिले अंतराळ स्थानक उभारण्यात येईल.