बंगालच्या निकालांवर बरीच चर्चा झाली आहे, त्यामुळेमी एका वेगळ्या विषयावर बोलू इच्छितो. तो विषय म्हणजेताजा निवडणूक निकालांचा या राज्यातील खेळांवर कायपरिणाम होऊ शकतो? परिस्थिती सुधारू शकते का आणिपुढचा मार्ग काय असेल? वस्तुस्थिती अशी आहे की गेल्या काही वर्षांतबंगालमध्ये क्रीडा क्षेत्रात कोणतीही वास्तविक प्रगतीझालेली नाही. राज्यात कोणतेही मोठे सामने आयोजितकेले गेले नाहीत. काही हॉकी टर्फ सोडले तर इतरकोणत्याही पायाभूत सुविधा विकसित झाल्या नाहीतकिंवा राज्यातून कोणतीही उल्लेखनीय प्रतिभा समोरआलेली नाही. ही तिथल्या राजकीय व्यवस्थेची टीकानाही, परंतु शेजारील राज्यांच्या तुलनेत असलेला फरकस्पष्टपणे दिसून येतो. बिहारचे क्रीडा बजेट आता चालू वर्षासाठी 550 कोटी रुपयांहून अधिक झाले आहे. ओडिशाने तर अनेकवर्षांपूर्वीच हे बजेट 1000 कोटींच्या पार नेले आहे. गेल्या दशकात ओडिशाने अनेक आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे यजमानपद भूषवले आहे. बिहारनेही आता तसे करण्यास सुरुवात केली आहे. तेलंगणानेही अनेक धोरणात्मक क्रीडा भागीदारी केल्या आहेत आणि अलीकडेच त्यांनी महिलाहॉकी विश्वचषक पात्रता फेरीचे यजमानपद भूषवले होते. बंगालमध्येही अफाट क्षमता आहे आणि जर गंभीर प्रयत्नकेले गेले, तर परिस्थिती बदलताना दिसू शकते. मीराजकीय परिस्थितीवर टिप्पणी करण्यासाठी स्वतःला पात्रमानत नाही, पण मी इतके निश्चितपणे सांगू शकतो कीखेळ ही एक मोठी संधी आहे. धनुर्विद्या, टेबल टेनिस,फुटबॉल, नेमबाजी, बॉक्सिंग या सर्व खेळांना बंगालमध्येमोठे भविष्य आहे आणि भाजप हे सिद्ध करण्यासाठीसर्वतोपरी प्रयत्न करेल. हीच ती गोष्ट आहे जी खेळांसाठीसंधी निर्माण करते. भारत आधीच 2030 च्या राष्ट्रकुल खेळांचे ययमानपदभूषवत आहे. आम्ही 2036 ऑलिंपिक आणि 2038आशियाई खेळांच्या यजमानपदासाठी देखील बोली लावतआहोत. स्पष्ट आहे की खेळाकडे आता सॉफ्ट पॉवरचेमाध्यम म्हणून पाहिले जात आहे आणि आशावादाचेमूळही हेच आहे. या क्षेत्रात काही ठोस करणे देशाचे लक्षवेधून घेईल आणि राजकीय वर्गालाही त्याचा फायदाहोईल, कारण हे साध्य करणे तुलनेने सोपे आहे. मोठेउद्योग उभारणे किंवा रोजगार निर्मिती करणे यांसारख्यागोष्टींचा प्रभाव दिसण्यासाठी बराच वेळ लागतो, तसेखेळाच्या बाबतीत नाही. खेळांमध्ये तुम्ही आंतरराष्ट्रीयस्पर्धांचे यजमानपद स्वीकारले, खेलो इंडिया सारखेकार्यक्रम राबवले किंवा राष्ट्रीय खेळांचे आयोजन केलेकी, अचानक संपूर्ण राज्याभोवती एक नवीन चैतन्यनिर्माण होते. पश्चिम बंगालमध्ये निश्चितपणे ही क्षमताआहे आणि पुढच्या एक-दोन वर्षांत या दिशेने काहीतरीमहत्त्वाचे घडताना दिसेल याची पूर्ण शक्यता आहे.बुद्धिबळाचेच उदाहरण घ्या. अनेक वर्षांपासून बंगालला याखेळाची समृद्ध परंपरा आहे. आपण टाटा स्टीलचेससारख्या स्पर्धा पाहिल्या आहेत. या खेळाला इतिहासआहे. मग अधिक आंतरराष्ट्रीय स्पर्धा का आयोजितकेल्या जाऊ शकत नाहीत? हीच गोष्ट बॉक्सिंग, तिरंदाजीआणि टेबल टेनिसलाही लागू होते. नेताजी इनडोअरस्टेडियम किंवा खुदीराम अनुशीलन केंद्रामध्ये शेवटचीमोठी क्रीडा स्पर्धा कधी झाली होती? बंगालमध्येलहानाचा मोठा होत असताना मी या संकुलांमध्ये अनेकआंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित होताना पाहिल्या होत्या, पणआता या स्टेडियमचा वापर बहुतेक करून राजकीय सभाआणि प्रदर्शनांसाठी होतो. रग्बी हा देखील असा खेळआहे ज्यामध्ये खूप काही केले जाऊ शकते. भारतानेचीनमध्ये झालेल्या 2023 च्या आशियाई खेळांपूर्वीकोलकाता येथे महिला प्रशिक्षण शिबिर आयोजित केलेहोते. अलीकडच्या वर्षांत बंगालने कोणत्याही मोठ्याक्रीडा स्पर्धेचे यजमानपद भूषवलेले नाही आणि जेव्हाकरण्याचा प्रयत्न केला जसे की लिओनेल मेस्सीच्याभारत भेटीदरम्यान तेव्हा त्याचे रूपांतर अखेर एकातमाशात झाले. भाजप या मुद्द्यावर अत्यंत आक्रमकराहिली आहे, त्यामुळे आता ही त्यांची जबाबदारी आहेकी, त्यांनी राज्यातील सुप्त गुणांना वाव द्यावा आणि याक्षेत्रात ठोस काम करून दाखवावे. याचे पहिले संकेततेव्हा मिळतील, जेव्हा नवीन क्रीडा मंत्र्यांची नियुक्तीहोईल आणि नवीन सरकारचा पहिला अर्थसंकल्प समोरयेईल. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) मोठे उद्योग उभारणीप्रमाणेच क्रीडा क्षेत्रातप्रभाव पाडण्यासाठी फारसा वेळ लागतनाही. तुम्ही आंतरराष्ट्रीय स्पर्धांचेयजमानपद स्वीकारले किंवा खेलोइंडियाचे आयोजन केले की राज्याच्यावातावरणात नवीन चैतन्य निर्माण होते.
Source link






