प्रियाला वाचवून चैतन्यनं फिरवलं अर्जुनच्या प्लॅनवर पाणी! ‘ठरलं तर मग’ मालिकेत आज काय पाहायला मिळणार?

0
2
प्रियाला वाचवून चैतन्यनं फिरवलं अर्जुनच्या प्लॅनवर पाणी! ‘ठरलं तर मग’ मालिकेत आज काय पाहायला मिळणार?


सायली आणि अर्जुन प्रियाला रंगेहाथ पकडणार इतक्यातच चैतन्यने तिथे पोहोचून प्रियाला आधीच सावध करायचा प्रयत्न केला. सायली आणि अर्जुनने बोलावलेल्या ठिकाणी प्रिया पोहोचतात तिच्या मागे चैतन्य देखील तिथे पोहोचला. चैतन्यने अचानक प्रियाच्या तोंडावर हात ठेवून, तिला एका कोपऱ्यात बाजूला नेलं. हे पाहून घाबरलेली प्रिया आधी चैतन्यवर ओरडायला लागली. ‘तू माझा जीव घ्यायचा प्रयत्न करतोयस का?’, असा प्रश्न देखील प्रियाने केला. तर, ‘मी तुझा जीव घ्यायला नाही, मी तुझा जीव वाचवायला आलोय’, असं म्हणत चैतन्य तिला अर्जुनचा सगळा प्लॅन सांगितला. चैतन्यने तिला एका कोपऱ्यात लपलेले सायली आणि अर्जुन देखील दाखवले. शिवाय हा पाठवलेला माणूस अर्जुन माणूस असल्याचं चैतन्यने प्रियाला सांगितलं.



Source link